मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे स्वप्न पुर्ण करू...



पंजाब:- दिल्लीच्या बाहेर प्रथमच आम आदमी पक्षाचे एकहाती सरकार सत्तेत येत आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेस, भाजप, अकाली दल या सर्वांना धुळ चारत पंजाबमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनीदेखील 45 हजारांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. तर, कॅप्टन अमरिंदर सिंह, नवज्योत सिद्दूसह अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांचा तर त्यांच्या दोन्ही मतदार संघात पराभव झाला आहे.

पंजाबमधील दणदणीत विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, ‘आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे स्वप्न पुर्ण झाले आहे. मतदारांनी केजरीवाल दहशतवादी नाही, तर मतदारांची मनं जिंकणारे आहेत, हे ठणकावून सांगितले आहे. आतापर्यंत सत्ता भोगलेल्यांनी सामान्यांना गरीब ठेवले आहे. त्यांनी फक्त सामान्यांना लुटण्याचे काम केले. त्यामुळे पंजाबमध्ये सत्तेत येऊ, नये हे त्यांचे स्वप्न होते. मात्र, मतदारांनी त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळवले आहे. आता ही क्रांती संपुर्ण देशात पसरेल.’

Post a Comment

Previous Post Next Post