चक्क खाण्याच्या चुन्या मागण्याच्या वादातून झाला... खून



राधानगरी:- शुल्लक कारणावरुन झालेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत (clash over minor dispute) झालं आणि त्यात एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना समोर आली आहे. आपण खूनाचे अनेक कारणं ऐकले आहेत. पण राधानगरीमध्ये चक्क चुना मागण्याच्या वादातून एक जणाचा खून करण्यात आला आहे.

चुना  मागण्यावरून जितेंद्र खामकर व विकास कुंभार यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यांनी एकमेकांना मारहाण देखील केली होती. हा वाद मिटवण्या करता  जितेंद्र खामकर यांनी आपल्या मामाला बोलून घेतले.

मामा अनिल रामचंद्र बारड  यांच्यासह जितेंद्र खामकर हे अकराच्या दरम्यान दोघेजण कुंभारवाडी येथे गेले. समजून सांगत असतानी अनिल रामचंद्र बारड यांच्यावर विकास कुंभार याने चाकूने वार केले.
त्यांना रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. अनिल रामचंद्र बारड यांचे वय ४७ असून ते कोल्हापूर जिल्हा संघात गोकुळ शिरगांव शाखेत मॅनेजर म्हणुन कार्यरत होते.

राधानगरी पोलिसांकडून विकास कुंभार  याला अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक एस. एस. कोळी व पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे हे या प्रकरणासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post