जिल्ह्यातील रेती घाटांची लिलाव प्रक्रिया सुरू झाली नसल्याने मोठ्या प्रमाणावर घरकुल लाभार्थ्यांची बांधकामे रेती अभावी ठप्प असल्याचे गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे सचिव दिलीप घोडाम यांच्या निदर्शनास आले.
निदर्शनास येताच घोडम यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे घरकुल लाभार्थ्यांना बांधकामे पूर्ण करण्यास पाच ब्रास मोफत देण्यात यावी.अशी मागणी केली.मागणी करताच राज्याचे महसूलमंत्री थोरात यांनी दखल घेऊन अखेर घरकुल लाभार्थ्यांचा बांधकामे करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
Tags:
आरमोरी