महाराष्ट्र :- शेतकऱ्यासाठी एक अनदांची बातमी याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल 10 ते 25 हजार प्रती हेक्टर नुकसान भरपाई राज्यात जून 2020 मध्ये ज्या शेतकाऱ्यांनाचे नुकसान झाले आहे.
त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जी. आर काढला आहे या अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अशी माहिती जी. आर मध्ये सांगण्यात आली आहे.
जून ते ऑक्टोबर 2020 मध्ये विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन ज्या शेतकाऱ्यांनाच्या पिकाचे नुकसान झाले होते याच शेतकऱ्यांना मिळेल 10 ते 25 हजार नुकसान भरपाई.
अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितिरीत करण्याबाबत शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे.
३३६४.०६ लाख रुपये म्हणजेच तेहतीस कोटी चौसष्ट लक्ष सहा हजार रुपये एवढा निधी अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिला जाणार आहे
10 ते 25 हजार प्रती हेक्टर नुकसान भरपाई
हा निधी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे या संदर्भातील यादी देखील दिनांक १५ जुलै २०२२ रोजी काढण्यात आलेल्या जी आर सोबत दिलेली आहे.
शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे दिली जाणार मदत.
महाराष्ट्र राज्यामध्ये सन २०२० या कालावधीमध्ये निर्माण झालेल्या पूर व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे
अशाच बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.
जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके या करिता 10 हजार रुपये प्रती हेक्टर एवढी मदत शासनाकडून दिली जाणार आहे
तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीपोटी २५ हजार रुपये प्रती हेक्टर मदत दिली जाणार आहे.
हि मदत जी दिली जाणार आहे ती दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे.
यादी पहा
खालील जिल्ह्यातील जिल्हातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 10 ते २५ हजार रुपयांपर्यंत मदत.
अमरावती.
बुलढाणा.
नाशिक.
जळगाव.
अहमदनगर.
सातारा.
सांगली.
सोलापूर.
कोल्हापूर.
Tags:
महाराष्ट्र