*गाढवी नदीच्या पुलाचे तुटलेले कठडे त्वरित लावा.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी.*


*गाढवी नदीच्या पुलाचे तुटलेले कठडे त्वरित लावा.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी.*

*आरमोरी*:- शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या गाढवी नदीच्या पुलावरील कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे या मार्गावरील येजा करणाऱ्या नागरिकांच्या व विद्यार्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरमोरी शहर हे जिल्ह्यातील शिक्षणाचे माहेर घर आहे. जिल्ह्यातील मुख्य मार्गावरील मोठ्या प्रमाणात खडे पडल्या ने बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थी साईकिल, मोटारसायकल ने ये-जा करावा लागतो. ठाणेगाव ,डोंगरगाव वनकी वासाडा चामोर्शी देऊळगाव इंजेवारी,चुरमुरा व इतर या गावातील बहुसंख्य विद्यार्थी या मार्गाने वगमन करत करतात व या राष्ट्रीय महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणात वाहनाची वरदळ असते सदर पुलिया अरुंद असल्यामुळे अपघात होऊन जीत हाणि होण्याची दाट शक्यता ना करताा येत नाही.तरी गाढवी नदीवरील तुटलेल्या कठड्याचे काम लवकरात लवकर करन्यात यावी ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रंजीत बनकर यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post