लखनौ :- समाजवादी पक्षाचे (सपा) विधान परिषदेचे सदस्य आणि उत्तर प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री स्वामीप्रसाद मौर्य स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वर्ण आणि जात या संकल्पना पूर्णपणे सोडून देण्याच्या अलीकडील विधानाचे कौतुक करतानाच त्यांनी सरसंघचालकांना हिंमत असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना जातिवादाचे विष देणाऱ्या 'मनुस्मृती' या पुस्तकावर बंदी घालण्यास सांगावे, असे थेट आव्हानही दिले.
पंतप्रधान मोदींवर आरोप
पंतप्रधान मोदींनी मागासवर्गीयांना दिलेले आरक्षण रद्द केल्याचा आरोप करत ते म्हणाले, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये एकाही मागास किंवा दलित व्यक्तीला नोकरी देण्यात आली नाही. आरक्षण संपवून सरकार मध्यस्थांना फायदा करून देत आहे आणि कंत्राटी नोकऱ्यांच्या नावाखाली तरुणांची पिळवणूक करत आहे.
भगवान बुद्ध हे जगातील पहिले धर्मगुरू आहेत, ज्यांनी संकीसामध्ये अवतार घेतला होता. त्यांचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहेत. आजही अमेरिका आणि रशियातील उत्खननात बुद्धाचे अवशेष सापडतात., अयोध्येत तीन वेळा बुद्धाचे अवशेष सापडल्यानंतर केंद्र सरकारने उत्खनन बंद केले होते. बुद्धाचा धर्म अमर आहे. त्याचे ज्ञान जिवंत आहे. बुद्धाच्या ताफ्यातील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. आता बुद्धाच्या काफिल्याला रोखण्याची हिंमत कोणाची नाही.
-स्वामी प्रसाद मौर्य, आमदार, सपा
Tags:
उत्तर प्रदेश