बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारने 21 ऑक्टोबर 2022 रोजी सुधारित पत्र जारी केले आहे - तसेच सरकारने काही नवे नियम देखील जारी केले आहेत.
💁♀️ *पहा कसे नियम ?*
▪️ बालविवाहासाठी आता - ग्रामसेवक, पुरोहित, छायाचित्रकार, आचारी, मंडप डेकोरेटर, वाजंत्री पथक, डिजे, पाहुण्यांसह मुला-मुलीच्या आई-वडिलांना देखील जबाबदार धरले जाणार आहे.
▪️ गावात बालविवाह झाल्यास - सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील व नोंदणी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार आहे - असे सरकारने म्हटले आहे
▪️ बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार दोषी असण्याऱ्याला दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडही होऊ शकतो.
▪️ ग्रामीण भागात बालविवाहावर कायद्याने प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना महिला व बाल विकास विभागाद्वारे दिल्या जातील.
Tags:
मुंबई