विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीचे पूजन करतो, परंतु सरस्वतीने शाळा महाविद्यालय सुरू केल्याचा कोणताही पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिक पुरावा नाही.

  
   

विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीचे पूजन करतो, परंतु सरस्वतीने शाळा महाविद्यालय सुरू केल्याचा कोणताही पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिक पुरावा नाही. 
    सनातनी परंपरेने स्त्री शिक्षणावरती बंदी घातली होती, त्यामुळे ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार नव्हता.
     सरस्वती एक महिला म्हणून तिच्याबद्दल आदर आहे, परंतु सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया आपल्या देशात प्रथमतः फुले दांपत्याने घातला.
      *सावित्रीबाई फुले यांच्या काळात जर सरस्वती जन्माला आली असती तर सावित्रीबाईंनी सरस्वतीलासुद्धा शिकविले असते, इतक्या मोठ्या मनाच्या सावित्रीबाई होत्या.*
      महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिकविले त्या देशातील पहिल्या शिक्षिका आहेत. त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढल्या. त्यांनी सर्व जाती धर्मातील मुला-मुलींना मोफत शिकविले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. बालविवाहाला प्रतिबंध केला. केशवपन पद्धतीला तिलांजली दिली.बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून निराधार महिलांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना मदत केली. गुंडांना पायबंद घातला. आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्त्री असल्याचा त्यांनी कधीही न्यूनगंड बाळगला नाही.त्यांनी सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले.पती निधनानंतर सती न जाता निर्भीडपणे सत्यशोधक चळवळीचे काम पुढे नेले.
      *सावित्रीबाई फुले यांच्या जीवनात अनेक संकटे आली, पण त्या संकटात डगमगल्या नाहीत, निराश झाल्या नाहीत. संकटाला संधी समजून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. सावित्रीबाई फुले लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य आपल्याला हे सांगते की मुलगीसुद्धा वंशाला दिवा असते.
     *सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा फोटो मूळ फोटो आहे.हा फोटो जाणीवपूर्वक काढलेला नसून सहज काढलेला आहे.यामध्ये सावित्रीबाई उजव्या बाजूला आहेत.म्हणजे स्त्री ही दुय्यम दर्जाची नसून ती देखील हिम्मतवान,बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असते, हे फुलेंच्या नेणिवेतदेखील होते.*
    *सावित्रीबाई यांनी ते दाखवून दिले,त्या भारतातील पहिल्या शिक्षिका आहेत,त्या केवळ पारंपारिक शिक्षिका नव्हत्या, तर त्या लेखिका,कवयित्री आणि प्रबोधनकार होत्या,त्यांची आज जयंती आहे,जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!*
         --डॉ. श्रीमंत कोकाटे


# *तुमच्या घरी सावित्री उत्सव साजरा करा.*👍🌹🌱📚
----------------^----------------
     महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी मराठा-बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले आहे.     
    *देशातील "महिलां"साठी महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीमाई यांनी स्वतः शिक्षण घेऊन महिलांना शिकवण्याचे काम केले. स्रियांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सावित्रीमाई फुले आणि जोतीराव फुले यांनी केली आहे त्यामुळे सावित्रीमाई फुले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिन ''महिला शिक्षण दिन'' म्हणून साजरा करण्यात यावा..!*
     स्रियांना 'चूल आणि मूल' या परंपरेतील चार भिंतीच्या पलीकडे आणण्याचे काम सावित्रीमाई फुले यांनी केले आहे.त्या काळात सामाजिक बहिष्कार स्वीकारून प्रसंगी शेण व दगडधोंड्यांचा मार सहन करत त्यांनी मुलींना शिकवण्याचे ऐतिहासिक कार्य केले त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा देशभरात 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरा करण्यात यावा..
   *महात्मा फुले अन सावित्रीमाई नी केलेला त्याग,ती ज्ञानदानाची तळमळ, त्यापायी भोगलेल्या हालअपेष्टा,अनंत यातना,अन त्यावेळी सनातन-ब्राम्हणाकडुन प्रत्येक वेळी झालेला विरोध,सततचा अन्याय अन तरीही या सर्वांना पुरुन उरणारे आपले साविञी-जोती सारखे मायबाप पाहताना ऊर भरुन येतो .*
    *नव्या वर्षाचा पहिला सण म्हणजे "सावित्री उत्सव.*
    *शेणा दगडांचा मारा सहन करीत,आपली अवघड वाट ती चालत राहिली म्हणूनच आपली वाट प्रशस्त झाली.महात्मा फुले सावित्रीमाई,यांच्यामुळे आपल्या सर्वांच्या जीवनात जे चांगले बद्दल झाले,आयुष्याला दिशा मिळाली त्याची "कृतज्ञ" आठवण घराघरात काढण्याचा हा दिवस.
     *3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा करायचा आहे.या दिवशी आपल्या घरासमोर रांगोळी काढून, उंबऱ्यावर ज्ञानाची पणती लावून,दरवाज्याला फुलांचे तोरण बांधून,घरात मध्ये सावित्रीमाई फुले यांचे फोटो ठेऊन पूजा करावयाचे आहे.*
   -> *त्यांच्या जीवनाविषय कार्याची आठवण करावी-वाचन करावे-मनन करावे.*
---------------->
   *"सावित्री आहे घरोघरी,*
*जोतिबाचा मात्र शोध जारी"!*
      ज्ञान नाही विद्या नाही !
ते घेण्याची गोडी नाही..!!
बुध्दी असूनि चालत नाही..!!!
त्याची मानव म्हणावे का ?
- सावित्रीमाई.
    *....मग यंदा तुम्ही तुमच्या घरी सावित्री उत्सव साजरा करताना.*
   - संतोष शकुंतला आत्माराम बादाडे-9689446003

*3 जानेवारी --* 
*क्रांतिमा सावित्रीमाई फुले जयंती* 

*कर्मठांचे विरोध झुगारून,*
*घेतला स्त्री आणि शुद्र शिक्षणाचा वसा*
*अनंत यातना, अवहेलना सोसून*
*उमटविला तुम्ही जगात ठसा..*
      ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षणा पासून आणि स्वातंत्र्या पासून दूर ठेवून परावलंबी आणि पराधीन ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला . पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोण असल्याने , स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली.
          महारष्ट्रातील महान समाज सुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारणाच्या कार्यात त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षण व बहुजन उध्दाराचे कार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले यांचा सातारा जिल्हातील, खंडाळा तालुका असलेल्या नायगावच्या *खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरी 3 जानेवारी 1831 रोजी जन्म झाला.* त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. त्यामुळे सावित्रीबाई सात वर्षांच्या होताच त्यांच्यासाठी नवरामुलगा शोधण्यासाठी मोहीम सुरु झाली. शिवाय सावित्रीबाई धिप्पाड, दणकट असल्याने सावित्रीबाईच्या आई – वडीलांनी मोहीम जोरात सुरु केली. त्यातून ज्योतिबा तेरा वर्षाचे आणि सावित्रीबाई नऊ वर्षाच्या असतांना विवाह सोहळा संपन्न झाला. 
        सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांना अपत्य नव्हते . त्यांनी यशवंत नावाचा मुलगा आणि त्यांच्या विधवा आईला आपल्या घरी सांभाळले. पुढे सावित्रीबाईंनी ज्योतीबांशी विचार-विनिमय करून यशवंतला च दत्तक घेतले . यशवंतच्या खऱ्या आईला सावित्रीबाईंनी अत्यंत प्रेमाने वागविले ही त्यांच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष . सावित्रीबाईंना बालपणी घरच्याकडून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणे त्या काळात शक्यच नव्हते. सावित्रीबाईना मात्र बालवयापासून शिकावे असे मनातून वाटत होते.
       ज्योतिबा बरोबर सावित्रीबाईंचा विवाह झाल्यावर त्यांना त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी चालून आली होती. ज्योतिबांच्याच मनाने स्त्रियांना शिकावे असा विचार केलेला असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीपासूनच स्त्रीशिक्षणाला आरंभ केला होता. ज्योतीबांच्या वडीलांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबत विरोध प्रकट केला होता. तिथे सुनेच्या शिक्षणाला ते नकार देतील यात काय आश्चर्य . पण ज्योतीबाच्या मुलींसाठी शाळा काढण्याचा विचार निश्चित झाला . त्यामुळे त्याचा आरंभ त्यांनी आपल्या पत्नीपासूनच म्हणजे सावित्रीबाई पासूनच केला. शेतात शेत-कामे करतांना झाडाखाली बसून काळ्या मातीत अक्षरे गिरवत सावित्रीबाई शिकू लागल्या . या मध्ये प्रगती झाल्यावर त्यांनी एका सरकारी शाळेत प्रवेश घेवून पुढचे शिक्षण चालू ठेवले .
        *1 जानेवारी 1848 साली ज्योतीबांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली.* पण मुलींना शिकविण्यास धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना . तेव्हा सावित्रीबाई शाळेत जावून मुलींना शिकवू लागल्या . महिलांनी शिकणे हे पाप, आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत असल्याने, सावित्रीबाई शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागल्या की पुण्यातले अतिकर्मठ लोकं त्यांच्यावर दगड, शेण, चिखल वैगरे फेकीत. पण सावित्रीबाईंनी या सर्व छळाला शांतपणे तोंड देवून मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले . पुणे आणि परिसर येथील हे शिक्षण कार्य पाहून *1852 मध्ये इंग्रज सरकारने फुले दाम्पत्यांचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केले .* 
       पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पावूल टाकून अंधपणे करीत नव्हत्या , तर त्या कार्यावर त्यांची निष्ठा होती , म्हणून ज्योतिबांच्या निर्वाणा नंतर सुध्दा त्यांनी सत्यशोधक समाजाचे ‘समता आंदोलन’ पुढे चालू ठेवले . सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्यांच्या ठायी असलेल्या कवि मनाला जे काही आढळले ते त्यांनी कविता आणि अभंगाच्या रुपात शब्दबद्ध केले. *त्यांचे ‘काव्यफुले’ आणि " बावन्नकशी सुबोध रत्नाकर "हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले.* ‘मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी ‘ या नावाने पुस्तकही प्रसिद्ध करण्यात आले . कित्तेक कवितात निसर्गाची मनोरम वर्णनं आलेली आहेत. काव्यलेखनाप्रमाणेच त्यांनी ‘गृहिणी’ या मासिकात लेखही लिहिले . त्यांच्या लेखनाला स्वानुभवाचा भक्कम आधार असल्याने ते लेखन परिणामकारक झाले आहेत.
    सावित्रीबाईंनी ज्योतीबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा ही त्यांची नितांत श्रध्दा . सामजिक कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळेच 1876-- 77 मधल्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे 1897 मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असतांना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या, आणि 10 मार्च 1897 मध्ये त्यांचे निर्वाण झाले . 
     समजातल्या दिन - दुबळ्यांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडणाऱ्या सावित्रीबाई फुले अद्वितीय आहेत. 
   अशा या *आदर्श शिक्षिका, लेखिका, माता, भगिनी, समाज क्रांतीची धगधगती मशाल, विद्देची जननी, विद्देची स्फुर्तीनायिका ....*
   *क्रांतीमा सावित्रीमाई फुले* 
            *यांना आमचे कोटी - कोटी वंदन...🙏💐*

प्रतिभा राजपाल वासनिक नागपूर महा राष्ट्र

वनवास सरस्वती शेंडे

Post a Comment

Previous Post Next Post