प्रेमीयुगुलाच्या प्रेम प्रकरणाचा झाला भयानक... शेवट

यवतमाळ : - यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे . यामध्ये एका प्रेमीयुगुलाच्या प्रेम प्रकरणाचा भयानक शेवट झाला आहे . या प्रेमीयुगलाची जात वेगवेगळी असल्याने समाज आणि नातेवाईक प्रेमविवाहाला संमती देणार नाहीत आणि एकमेकांशिवाय जगताही येणार नाही म्हणून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला . मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते . या प्रकरणात प्रियकराचा मृत्यू झाला आहे तर प्रेयसी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे . काय आहे नेमके प्रकरण ? कपिल बावणे असे आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे . तो यवतमाळ जिल्ह्यातील कळंबनजीक असणाऱ्या मावळणी गावातील रहिवासी होता . त्याचे याच गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते . पण समाज प्रेमाला मान्यता देत नाही . तसेच दोघांची जातही वेगळी असल्याने लग्नात अनेक अडथळे येणार होते . दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता . मात्र परिस्थिती आणि समजापुढे त्यांना काहीच करता येत नव्हतं . यामुळे त्यांनी एकत्र जगता येत नसेल तर एकत्र मरू असा विचार करून एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला .यानंतर या दोघांनी गावाजवळच्या एका शेतात जाऊन विष प्राशन केले . या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी दोघांनाही कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना यवतमाळ याठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आले . पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता . रुग्णालयात जात असताना वाटेतच प्रियकर कपिलने अखेरचा श्वास घेतला . तर प्रेयसीची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे . तिचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे . या तरुणीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत आहेत . तसेच संबंधित तरुणीचं आठ दिवसांपूर्वीच धुळ्यातील एका तरुणासोबत लग्न ठरलं होतं . याच कारणातून दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला . या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे . तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post