भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सामाजिक न्याय भवन चंद्रपूर येथे भिम् जयंती साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सामाजिक न्याय भवन येथे जयंती कार्यक्रम आज उत्साहात पार पडला.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला बहुमूल्य संविधान दिले आहे. समाजातील शेवटच्या घटकाला उभे करण्याची शक्ती संविधानात आहे. 1956 मध्ये नागपूर येथे बौध्द धम्माची दीक्षा घेतल्यानंतर डॉ. बाबासाहेबांनी दोन दिवसानंतर म्हणजे 16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपूरात दीक्षा दिली. त्यामुळे येथील दीक्षाभुमीच्या विकासासोबतच चंद्रपूरात संविधान भवन निर्माण केले जाईल.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर प्रथमच डॉ. बाबासाहेबांची जयंती संपूर्ण देशात मोठ्या आनंदाने साजरी होत आहे. संविधान भवनाचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाने त्वरीत पाठवावा. जमीन उपलब्धतेसोबतच टप्प्याटप्प्याने यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच चंद्रपूर येथील दीक्षाभुमीच्या विकासासाठी 20 कोटी रुपयांचे नियोजन, सिंदेवाही येथील दीक्षाभुमीसाठी एक कोटी आणि ब्रम्हपूरी येथील दीक्षाभुमीसाठी सव्वा कोटी रुपयांची तरतुद करण्यात येणार. ब्रम्हपूरी तालुक्यातील अड्याळ येथे विपश्यना केंद्र निर्मितीसाठी 45 कोटी मंजूर झाले आहेत. यातील पहिला टप्पा 15 कोटींचा.


बाबासाहेबांचे नाव, विचार आणि त्यांनी दिलेले संविधान नागरिकांनी कायम आपल्या मनात कोरून ठेवले पाहिजे. देशाची लोकशाही संविधानानुसार चालते. धर्म माणसाला जोडणारे असावे. कोणत्याही धर्माच्या ग्रंथाला मानत असाल तर माना, मात्र संविधान हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, याची जाणीव ठेवा. संविधानाने समाजातील प्रत्येक व्यक्ती, धर्माला न्याय देण्याचे काम केले आहे. शोषित, वंचित, पिडीत यांना न्याय देऊन येथील विषमता नष्ट करण्याचे महान कार्य डॉ. आंबेडकरांनी केले आहे. ज्ञानाचा उगम बाबासाहेबांपासून झाला, याची नागरिकांनी जाणीव ठेवावी. बाबासाहेब हे सर्व धर्मियांचे होते. हिंदू कोड बिल आणून महिलांना बाबासाहेबांनी सन्मान मिळवून दिला. संत कबीर, संत तुकाराम आणि महात्मा ज्योतिबा फुले हे बाबासाहेबांचे तीन गुरु होते. तसेच तथागत गौतम बुध्दांच्या विचारांचा त्यांनी स्वीकार करून बौध्द धर्माची दीक्षा घेतली. तथागतांच्या विचारातच जगाचे कल्याण आहे.


कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, प्रकाश देवतळे, सुनिता लोढिया, नंदू नागरकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post