डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार

*(75 Thoughts of Dr.Babasaheb Ambedkar in Marathi )*
*(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.*
*(२) आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका.*
*(३) स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !*
*(४) लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.*
*(५) शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.*
*(६) लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.*
*(७) मी नदीच्या प्रवाहालाच वळवणा-या भक्कम खडकासारख आहे.*
*(८) मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभीमान निर्माण केला आहे.*
*(९) देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.*
*(१०) अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.*
*(११) स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.*
*(१२) सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततही भारतीय ही भूमिका घ्यावी.*
*(१३) चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.*
*(१४) उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.*
*(१५) माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.*
*(१६) करूणेशिवाय विद्या बाळगणा-याला मी कसाई समजतो.*
*(१७) शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.*
*(१८) पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.*
*(१९) ग्रंथ हेच गुरू.*
*(२०) वाचाल तर वाचाल.*
*(२१) इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.*
*(२२) मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.*
*(२३) तिरस्कार माणसाचा नाश करतो.*
*(२४) माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल.*
*(२५) एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.*



*(२६) भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.*
*(२७) धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.*
*(२८) लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.*
*(२९) द्वेषाला सहानूभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.*
*(३०) बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.*
*(३१) बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान.*
*(३२) धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.*
*(३३) मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.*
*(३४) शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!*
*(३५) सा-या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते.*
*(३६) शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.*
*(३७) विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे.*
*(३८) सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार.*
*(३९) सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.*



*(४०) अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.*
*(४१) मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.*
*(४२) जगात म्हणे, सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत असे एक युरोपियन म्हणाले होते.*
*(४३) ज्यांच्या अंगी धैर्य नाही. तो पुढारी होऊ शकत नाही.*
*(४४) बौद्ध धर्म हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे.*
*(४५) भगवान बुद्धाने सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धाने मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.*
*(४६) सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही.*
*(४७) बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याच्या एकमेव असा धर्म आहे.*
*(४८) बुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही.*
*(४९)शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.*
*(५०) महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ति-स्वातंत्र्याची फुले वाहू नका.*
*(५१) शंका काढण्यास देखील ज्ञान लागते.*
*(५२) आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?*
*(५३) हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.*
*(५४) नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.*



*(५५) जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.*
*(५६) वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.*
*(५७) मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.*
*(५८) माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.*
*(५९) पती- पत्नि मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.*
*(६०) जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.*
*(६१) शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.*
*(६२) तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.*
*(६३) मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.*
*(६४) जर या देशात शुद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.*
*(६५) प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.*
*(६६) मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.*
*(६७) तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.*
*(६८) सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली म्हणजे राजकिय शक्ती हीच होय.*
*(६९) जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.*
*(७०) स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.*
*(७१) माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.*
*(७२) कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.*
*(७३) बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.*
*(७४) एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.*
*(७५) शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.*

🙏🏻

Post a Comment

Previous Post Next Post