मुंगली आणि मुंगली (टोली) येथे जिओ टॉवर रेंजची क्षमता वाढवा - नागरिकांची मागणी

नवेगाव बांध :- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मुंगली, मुंगळी (टोली), भुरशी (टोला) या गावांमध्ये जिओ टावर मोबाईलची रेंज नसल्यामुळे जिओ ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.


जियो नेटवर्क वरुन फोन केला असता अचानकपणे फोन कट होत असतो. ततर कधि कधि आवाज सुध्दा कमि जास्त येत असते. तसेच आपले नातेवाईक आपल्याला कॉल केले तर फोन कव्हरेजच्या बाहेर असं दाखवल्यामुळे महत्त्वाचे कामे होत नाहीत.




त्यामुळे जियो मोबाईल टावरची रेंजची क्षमता कमी असल्यामुळे नागरिक त्रासलेले आहेत. रिचार्ज मारूनही मोबाइल खेळण्याची वस्तू बनलेली आहे. त्यामूळे परीसरात असलेल्या जिओ कंपनीच्या टावरची रेंज वाढवण्याची मागणी मुंगली आणि मुंगली (टोली) येथील नागरिकांनी जिओ कंपनीलाकडे केली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post