3 नक्षलींचा खात्मा



रायपूर, . छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षादलाच्या जवानांना यश आले आहे. तेलंगणाच्या सीमेजवळील छत्तीसगडच्या बीजापूर तालुक्यातील जिल्ह्यातील घनदाट जंगलात सुरक्षादलाच्या जवानांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षादलाच्या जवानांसोबत चकमक झाली. चकमकीनंतर घटनास्थळावरून हत्यारेदेखील जप्त केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा दल मोहिमेवर असताना तेलंगणा- छत्तीसगड सीमेवरील पुडजारी कांकेरमळी करींगुटाच्या जंगलात ही चकमक झाली.

आतापर्यंत 43 जणांचा खात्मा या भागात नक्षलविरोधी अभियानांतर्गत नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरु आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत तीन महिलांसहित कमीत कमी 43 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post