आरमोरी:- तालुक्यापासून कुरखेडा तालुक्यात व धानोरा तालुक्यातील गावाला जोडलेला भाकरोंडी, मुस्का, खांबाळा, अंगारा मार्ग हा अतिशय खराब अवस्थेत झालेला आहे. सदरील मार्ग हा कुरखेडा, धानोरा तालुक्यातील 25 ते 30 गावांना जोडनारा महत्त्वाचे असून, या रस्त्यावर खोब्रागडी नदीवर दळणवळणाच्या दृष्टीने जनतेच्या हिताकरिता पुलाचे काम करणे अत्यंत आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे नैसर्गिक येणाऱ्या पाण्याने येथील जीवनमान विस्कळीत होत असून आरोग्य तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ये जा करण्याकरीता येथील जनतेला अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. सदरील रस्ता हा पूर्णपणे उकळून गेला असल्यामुळे दुचाकी चार चाकी व सायकलने सुदधा प्रवास करणे अतिशय कठीण झालेला आहे. याचा संपूर्ण त्रास परिसरातील जनतेला सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरील नदी पुलाचे काम त्वरित करण्यात यावे अशी खांबाळा व अंगारा या परिसरातील जनतेने केली आहे.
करिता दळणवळणाच्या हिताच्या दृष्टीने मौजा अंगारा व खंबाळा रस्त्यावर असलेल्या खोब्रागडी नदीचे पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार श्री. आनंदराव गेडाम यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई, 32 यांना निवेदनातून केली आहे.
Tags:
आरमोरी