अहमदनगर:- जिल्ह्यातील राहुरी येथे खळबळजनक प्रकरण समोर आले असून एका आरोपीने बावीस वर्षीय विवाहित तरुणीला फूस लावून पळवून नेले आहे. 17 सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अवघ्या काही वर्षांपूर्वी या तरुणीचे लग्न झाले होते त्यानंतर आरोपी राहुरीला आला आणि तिला तिच्या घरातून पळून घेऊन गेला.
उपलब्ध माहितीनुसार, बाबासाहेब जबाजी आघाव असे संशयित आरोपीचे नाव असून पीडित तरुणी ही तिच्या पतीसोबत राहुरी येथे राहते. 17 तारखेला दुपारी अडीचच्या सुमारास ती घरी एकटीच होती त्यावेळी आरोपी तेथे आला आणि त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत घरातून पळून नेले. पतीला या संदर्भात समजताच तात्काळ त्याने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झालेली आहेत .
Tags:
अहमदनगर