आरमोरी : पुस्तक वाचनाने ज्ञानप्राप्ती होते. माणसाची बुद्धी चौकस होते. त्यामुळे पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले जावे यासाठी महामानवाच्या जयंतीदिनी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ साखरे यांनी ४०० पुस्तकाचे लोकांना वितरण करून पुस्तक वाचनाचे महत्त्व लोकांना सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा याची मार्गदर्शन करणारी पुस्तिका ही त्यांनी वितरित केली. त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतक होत आहे.