मुलं चोरणारी टोळी सक्रिय...... निव्वळ फेक बातमी

विदर्भ:- मुंबई/ चंद्रपूर - सोशल मीडियाचा अति वापर वाढल्याने कोणत्याही खोट्या अफवा पसरविण्याचे प्रमाण वाढले आहे, अश्या खोट्या अफवांवर नागरिक सुद्धा विश्वास करू लागले, मात्र या अफवेवर विश्वास ठेवल्याने अनेक अनुचित घटना राज्यात घडत आहे.



गेल्या काही दिवसांत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुलं चोरणारी टोळी आहे समजून मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या वाढलेल्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण असल्याचंही अधोरेखित झालं आहे. Child kidnapping Gang मुलं चोरणारी टोळी सक्रिय आहे, ते तुमच्या आसपास येऊ शकते, अशा आशयाचे अनेक मेसेज सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल झालेत. त्यामुळे पालक धास्तावलेत. rumor पोलिसांनी सुद्धा समाज माध्यमांद्वारे नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

पालकांनी सतर्क राहावं आणि अफवांना खतपाणी घालू नये, असं सांगण्यात आलंय. गेल्या काही आठवड्याभरापासून राज्यातील महत्त्वाच्या शहरात मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

माहितीची शहानिशा न करता खोटी माहिती शेअर करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

व्हॉट्सअप, फेसबुकसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मेसेज, व्हिडीओ, फोटोच्या माध्यमातून व्हायरल मेसेज पसरवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुलं चोरणारी टोळी आहे समजून मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या वाढलेल्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण असल्याचंही अधोरेखित झालं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post