विरेंद्र म्हात्रे उपसंपादक नवी मुंबई :कुख्यात गुंड विक्रांत उर्फ विक्की देशमुख व त्याच्या साथीदारांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या टाेळीकडून सुमारे सात गुन्ह्यांची उकल करण्यात पाेलिसांना यश आलं आहे अशी माहिती पाेलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी दिली.
विक्की देशमुख आपल्या टोळीच्या माध्यमातून नवी मुंबईसह राज्यात आपली दहशत निर्माण करु पाहत होता. खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, अपहरण, खंडणी, बलात्कार सारखे गंभीर गुन्हे विक्की देशमुख आणि त्याच्या टोळीतील त्याच्या साथीदारांवर दाखल आहेत.
सचिन घरत याची हत्या, अशोक घरत याचे अपहरण करून हत्या, टीव्ही केबल चालकाकडून खंडणी, क्रशर प्लांट चालकाकडून खंडणी, अल्पवयीन मुलीवर बलात्कार असे गंभीर आरोप असणाऱ्या विक्की देशमुख व त्याला या गुन्ह्यात साथ देणाऱ्या आरोपीच्या नवी मुंबई पोलीसांनी मुसक्या आवळल्यात.
कुख्यात गुंडाला व त्याच्या टोळीतील सदस्यांना अटक केल्याने विक्की देशमुखच्या टोळीचा खात्मा करण्यात नवी मुंबई पोलीसांना यश आले असून या टोळीकडून कोणाला धमकावण्यात आले असल्यास नवी मुंबई पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी सांगितले आहे.
Tags:
मुंबई