नागभीड:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागभीड तालुक्यातील वासाळामेंढा येथे वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना आज सायंकाळी आठ वाजता घडली .
वासाळा मेंढा येथील संजू सुकारे यांची गाय गोठ्यामध्ये असताना वाघ गावात येऊन गोठ्यातील गाईवर हल्ला करून जागीच ठार केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रथमच वाघ गावात येऊन असा हल्ला केल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा वाघाचा बंदोबस्त वन विभागाने तात्काळ करावा तसेच माझ्या गाईची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गाय मालकांनी वन विभागाकडे केली आहे.
Tags:
नागभीड