गोंदिया:- धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळावा ही सरकारचीसुद्धा भूमिका आहे. याचा लाभ शेतकऱ्यालाच मिळावा, यातील गैरव्यवहार दूर व्हावा यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. त्यासाठी उपसमिती गठित करण्यात आली असून, धान उत्पादक शेतकऱ्यांना निश्चित बोनस मिळेल अशी ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी दिली.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या
कुटुंबीयांना ३० दिवसांच्या आत नुकसानभरपाई दिली जावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यापेक्षा अधिक विलंब झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांन व्याजासह रक्कम देण्याची तरतूद केली असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
Tags:
गोंदिया