देसाईगंज येथील ती हत्या अनैतिक संबंधातून... पोलीस तपासात उघड


देसाईगंज : येथील हत्याकांड प्रकरणात आरोपींची संख्या दिवसेंदिवस तपासत वाढत आहे. अनैतिक संबंधातूनच पत्नी व आरोपी यांनी कट रचून हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मृतक आशिषच्या पत्नीला मंगळवारी देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे.

आशिषच्या खून प्रकरणाची पूर्वतयारी ही एक महिन्यांपूर्वीपासून मृतकाची पत्नी सपना आशिष मेश्राम व मुख्य आरोपी विशाल रेखडे यांच्याकडून केल्या जात होती. सदर प्रकरण हे अनैतिक संबंधातून घडले असल्याचे मुख्य आरोपी विशाल व सहआरोपी सपना यांनी बयानावरून मान्य केले आहे. विशाल व सपनाचे आठ वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. परंतु मृतक आशिषने सपनापुढे प्रेमाचा प्रस्ताव ठेवून आपण एकत्र राहू, अशी मागणी केली असता, सपनाने त्यास होकार दिला. तेव्हापासून ते पतीपत्नी प्रमाणे राहत होते.

काही दिवसांनी पुन्हा विशाल व सपनाचे प्रेमाचे चाळे सुरू झाले. या प्रकरणाची भणक आशिषला लागली.त्याने आरोपी विशालला मारण्याची धमकी दिली असता, दोघांमध्ये घटनेच्या अंदाजे काही दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर विशाल व सपनाने काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन ११ ऑक्टोबरला आशिषचा खून केला. त्यानंतर सपनाने पती हरवले असल्याचा बनाव करीत देसाईगंज पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसी नजरेतून ती सुटू शकली नाही. तिला व तिचा प्रियकर विशालला अटक केली. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post