वाघाच्या हल्ल्यात सुधाकर भोयर जागीच ठार

गडचिरोली,  : जिल्ह्यात वाघाचे इसमावरील हल्ले थांबता थांबेना, तालुक्यातील राजगाटा चक शेतशिवारत स्वतःचे बैल राखत असतांना वाघाने हल्ला करून इसमास ठार केल्याची घटना आज 3 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. सुधाकर उरकुडा भोयर (55) राजगाटा चक असे मृतक इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, सुधाकर भोयर हे  जंगलामध्ये बैल राखत होते. दरम्यान वाघाने त्यांच्यावर झडप घेऊन नरडीचा घोट घेत ठार केले. यांच्या मृत्यूने भोयर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या परिसरातील ही तिसरी घटना असल्याचे बोलल्या जात आहे. 


या परिसरात नरभक्षी वाघाने धुमाकूळ माजवत आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. वाघास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक वारंवार करीत आहे मात्र वनविभाग यात अपयशी ठरत आहे. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.

  नरभक्षक वाघचे या भागात वावर असल्याचे वन विभागाचे कर्मचारी गावातील नागरिकाना सूचना देण्यात आली होती तरी त्या सूचनेकडे दुर्लक्ष करून शेतकरी आपले गुरे ढोरे शेतात नेतो म्हनून जंगलात नेतात. त्यामूळे अश्या घटना वारंवार होत आहेत तरी शेतकऱ्यांनी जंगलात प्रवेश करू नये असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.विभागाचे कर्मचारी गावातील नागरिकाना सूचना देण्यात आली होती तरी त्या सूचनेकडे दुर्लक्ष करून शेतकरी आपले गुरे ढोरे शेतात नेतो म्हनून जंगलात नेतात. त्यामूळे अश्या घटना वारंवार होत आहेत तरी शेतकऱ्यांनी जंगलात प्रवेश करू नये असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी व रेस्कु टीम जंगलामध्ये पिंजऱ्यात रेडे ठेऊन वाघाला जेरबंद करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. जो पर्यंत वाघ सापडत नाही त्यामुळे जंगलात कोणीही जाऊ नये असे असे वन विभागाणे कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post