राजस्थानच्या भरतपूर मध्ये अचानक एक युवक घरातून गायब झाल्याने वडिलांनी त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसात आठवड्या नंतर नोंदवली होती.पण तो युवक काही सापडला नाही. दिवसामागून दिवस जात असताना मुलाच्या वडिलांनी एक दिवस त्याच्या सुनेला युवकासोबत नको त्या अवस्थेत पकडले आणि पोलिसांना सांगितले. त्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.
पोलिसांनी दिलेल्या महिती नुसार नौह गावात राहणाऱ्या पवन शर्मा याचा विवाह उत्तरप्रदेश च्या कानपुर येथे राहणाऱ्या रिमा नामक 23 वर्षीय तरुणीशी झाला होता. लग्नांनातर पवन आणि रिमा यांना दोन ओत्ये देखील झाली. पण त्यानंतर रिमा शेजारी राहणाऱ्या भागेंद्र उर्फ भोलाच्या प्रेमात पडली. वेळ मिळेल तेव्हा ते एकत्र येऊ लागले. इतकेच काय तर पवन घरी असतांना आणि तो झोपला असतांना देखील ते शारीरिक संबंध बनवू लागले.
एक दिवस रात्री ते शारीरिक संबंध ठेवत असतांना आवाज ऐकून पवन ची झोप उघडली. तेव्हा त्याने त्या दोघांना विवस्त्रावस्थेत बघीतले. आता आपले बिंग फुटेल म्हणून भोला आणि रिमा ने पवन ची हत्या करून प्रेत कॅनल मध्ये फेकले. त्यांनतर ते कुठलीही आडकाठी नसल्याने आणि स्वैराचार करू लागले. एक दिवस ते शरीर संबंध ठेवत असतांना पवन च्या वडिलांना दिसले . त्यांनी पोलिसांना या बद्दल कल्पना दिली.
पतीला मारल्यानंतर पत्नी आणि तिचा प्रियकर रोज रात्री भेटत असायचे. 16 ऑक्टोबरला त्यांचे बिंग फुटले. पवनच्या वडिलांनी दोघांनाही तशा अवस्थेत पाहिले आणि संशय आला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु केली. त्यांनी गुन्हा कबुल करताच त्यांना कालव्याजवळ नेण्यात आले. गोताखोरांनी कालव्याच्या पाण्यातून मृत पवनची पॅन्ट, आधारकार्ड आणि काही हाडे मिळविली आहेत.
Tags:
राजस्थान