अजबच! 4 राज्यांत 6 बायका; जिथे जायचा तिथे 'हा' करायचा लग्न'; अखेर 'अशी' झाली पोलखोल


बिहारच्या जमुईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या भावोजीला एका महिलेसोबत रंगेहात पकडलं आणि कुटुंबीयांना याची माहिती दिली. जेव्हा नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. तेव्हा सत्य समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या व्यक्तीने सहा लग्न केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी चौकशी केली असता छोटू नाव असलेल्या या व्यक्तीच्या चार राज्यांत सहा पत्नी आहेत. 

पहिल्या पत्नीपासून त्याला चार मुलं आहेत. तसेच आणखी एका महिलेपासूनही दोन मुलं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जावातारी गावात ही घटना घडली आहे. छोटूची पत्नी मंजू हिचा भाऊ विकास हा कोलकाता येथे जाण्यासाठी जमुई स्टेशनवर आला होता. तेव्हा त्याला छोटू दिसला. त्या आपल्या बहिणीचा नवरा अन्य एका महिलेसह ट्रेनची वाट पाहत असल्यातं समजलं. त्याने लगेचच कुटुंबीयांना याची माहिती दिली. 

व्हिडियो
👇👇👇




कुटुंबीयांनी छोटू आणि त्याच्यासह असलेल्या महिलेला रंगेहाथ पकडलं. जेव्हा तिच्याबाबत विचारलं तेव्हा त्याने ही आपली पत्नी असल्याचं सांगितलं. हे ऐकताच नातेवाईक हैराण झाले. त्यानंतर छोटूला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मंजूच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये माझ्या मुलीचं याच्याशी लग्न झालं होतं. दोघांना दोन मुलं देखील आहेत. पण अचानक दीड वर्षांपूर्वी हा औषध आणायला सायकल घेऊन गेला तो परत आलाच नाही. त्यानंतर आज त्याला विकासने पकडलं आहे. छोटू हा देवघरच्या मां शारदा आर्केस्ट्रामध्ये काम करतो. या चार राज्यात त्याच्या सहा पत्नी आहेत. छोटूने चिनवेरिया, सुंदरटांड, रांची, संग्रामपूर, दिल्ली आणि देवघर येथे राहणाऱ्या महिलांशी लग्न केलं आहे आणि या सर्वांना मुलं देखील आहेत. जिथे आर्केस्ट्रा असेल तिथे तो जायचा आणि लग्न करायचा. आतापर्यंत त्याने सहा महिलांना धोका दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post