मामीच्या अफेरची तालुक्यात चर्चा, नवरा आणि दोन लेकरांना सोडून भाच्याला


गढिया:- लग्नानंतरही अनेकांचे बाहेर अफेर असल्याची अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत. विवाहबाह्य संबंध समोर आल्यावर अनेकांचे संसार मोडले आहेत. काहीवेळा घरातील सुनेचे तिच्या दीरासोबत अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं मात्र त्यानंतर भावानेच सख्या भावाची हत्या केल्याची अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. (mami Bhanja extra marital affairs) अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये मामी तिच्या भाच्याच्या प्रेमात दिवाणी झाली. संसार वाऱ्यावर सोडत भाच्यासोबत ती पळून गेली होती. मुलाच्या आईमुळे दोघांची लवस्टोरी समोर आली. (mami Bhanja extra marital affairs Uttarpradesh latest marathi crime news)

नेमकं काय आहे प्रकरण? 
सहा वर्षांपूर्वी संबंधित मामीचा गढिया गावातील तरूणासोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यावर दोन मुलंही झालीत. मामाच्या घरी भाचा येत होता. भाच्यावर मामीचा जीव आला, दोघांचंही सूत जुळलं. मामीला तिचा पती आवडत नसायचा, शेवटी दोघांनी मोठा निर्णय घेतला. मामी भाच्याला सोबत घेऊन फरार झाली, घरी पती आणि दोन मुलांना वाऱ्यावर सोडत ती पळून गेली. 

दोघेही पळून गेल्यावर मुलाच्या आईलाही याची काही कल्पना नव्हती. मुलगा का घरी येत नाही म्हणून आईने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी शोध घेणं सुरु केल्यावर दोघांचा पत्ता लागला. पोलिसांना समजलं की, मुलगा मध्य प्रदेशमध्ये एका महिलेसह राहत होता. दोघेही नवरा-बायको असल्यासारखे राहत होते. ती महिला दुसरी तिसरी कोण नसून ती मामी होती. 
 
पोलिसांनी दोघांना पकडत उत्तर प्रदेशमध्ये झांसीला नेत दोन्ही परिवारांना बोलावून घेतलं. त्यावेळी मामी-भाच्याचं प्रेम प्रकरण समोर आलं. चौकशीवेळी मामीने सांगितलं की, तिचा पती आवडत नव्हता, भाच्यावर प्रेम आलं म्हणून आम्ही मिळून पळून गेल्याचं कबूल केलं.  


Post a Comment

Previous Post Next Post