पती नको फक्त तू हवास असे म्हणत...



नागपुर:- महाराष्ट्रात खळबळजनक घटना समोर आली असून एका विवाहित प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक गड मंदिर परिसरात अंबाडा मार्गावर झाडाला गळफास लावून या प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली. सदर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह खाली उतरवले आणि घटनास्थळाचा पंचनामा केला.

उपलब्ध माहितीनुसार, कांचन ज्ञानेश्वर रंधई ( वय 30 ) आणि मयूर गजानन माणूसमारे ( वय 30 दोघेही राहणार सावंगी देवळी तालुका हिंगणा ) अशी मयत प्रेमीयुगुलाची नावे आहेत. कांचन हिला सात आणि दोन वर्षांची मुले असून तिचे घराशेजारी राहणारा मयूर गजानन माणूसमारे याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले होते . सदर प्रकाराची घरच्यांना कल्पना आली आणि त्यानंतर कुटुंबात वाद सुरू झाले. कांचन ही मयूर याच्यासोबत काही महिन्यांपूर्वी पळूनही गेली होती.

तिच्या पतीने ती गायब झाल्याची फिर्याद देखील हिंगणा पोलीस स्टेशन येथे नोंदवली होती मात्र ती दोन महिन्यांनी परत आली. पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांना समोरासमोर बोलून समजूत घालून त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात केले दिले होते मात्र कांचन ही तिचा पती किंवा तिचा पती किंवा आई-वडील कुणाकडेच राहण्यास तयार नव्हती आणि त्यानंतर हा खळबळजनक प्रकार घडला.

Post a Comment

Previous Post Next Post