मंदिरे व विश्‍वविद्यालयांवर अवैध कब्जा करूनही आरएसएसचे इस्लामिक राजवटीकडे बोट

मंदिरे व विश्‍वविद्यालयांवर अवैध कब्जा करूनही आरएसएसचे इस्लामिक राजवटीकडे बोट

चोर तो चोर वर शिरजोर अशी आरएसएसची अवस्था


देशातील बुद्ध विहारांचे रूपांतर मंदिरांमध्ये करतानाच या मंदिरांवर व विश्‍वविद्यालयांवर अवैध कब्जा करूनही आरएसएसने इस्लामिक राजवटीकडे बोट दाखवण्याचा प्रकार केला आहे. यावरून चोर तो चार वर शिरजोर अशी आरएसएसची अवस्था झाली आहे. इस्लामिक राजवटीत देशाने आपली वैभवशाली मंदिरे, विद्यापीठे आणि मूल्यव्यवस्था गमावली असे आरएसएसचे वरिष्ठ पदाधिकारी अरुण कुमार यांनी जे. नंद कुमार यांच्या ‘एसडब्ल्यूए: स्ट्रगल फॉर नॅशनल सेल्फहुड’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना अशाप्रकारे अकलेचे तारे तोडले आहेत.


आरएसएसचे वरिष्ठ पदाधिकारी अरुण कुमार म्हणाले की, इस्लामिक राजवटीत देशाने आपली वैभवशाली मंदिरे, विद्यापीठे आणि मूल्यव्यवस्था गमावली. त्याच वेळी युरोपीय राज्यकर्त्यांनी राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि समाजवाद संपवण्याची मोहीम चालवली. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना गेल्या १००० वर्षांच्या स्वातंत्र्यलढ्याचे स्मरण करणे आवश्यक आहे आणि या हल्ल्यांपासून देश कसा बचावला. देशात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर चर्चा होण्याची गरज आहे. 



इस्लामी आक्रमणापूर्वी ते कसे होते आणि युरोपीय आक्रमणापूर्वी काय होते यावर चर्चा करणे आवश्यक आहे. देश इस्लामिक राजवटीचा सामना करू शकला कारण गावातील कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था अबाधित राहिली. युरोपियन आक्रमण समजून घेणे आवश्यक आहे. की ते विशिष्ट उद्देश आणि पार्श्‍वभूमीसह भारतात आले होते. युरोपियन आक्रमकांनी गोर्‍या माणसांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा आणि देशातून राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि समाजवाद नष्ट करण्याचा प्रयत्न केला.


दरम्यान, आरएसएसचे अरूण कुमार स्वत: डीएनएनुसार विदेशी आक्रमणकारी ब्राम्हण आहेत. याच ब्राम्हणांनी आक्रमण करून भारतावर कब्जा केला. सर्वच क्षेत्रात कब्जा करणारे ब्राम्हण दुसर्‍यांकडे बोट दाखवत आहेत हे अजबच म्हणावे लागेल अशा प्रतिक्रिया जनमानसात व्यक्त होताना दिसत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post