माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आलापल्ली साॅ-मीलला भेट देऊन केली पाहणी
गडचिरोली :- हिंदुचे श्रदास्थान असलेल्या अयोध्येचे राम मंदीर देशात सर्वात जिव्हाळ्याचा मुद्दा आहे.९० च्या दशकात देशभरातुन त्यासाठी विटा पाठविल्या गेल्या होत्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदीर निर्माण कार्य सुरु होताच प्रत्येक रामभक्ताने यथाशक्ती आपला खारीचा वाटा पाठविला आहे. तेथे आता या भागातील जगप्रसिध्द सागवान लाकडाची मंदिरात दरवाजे व खिडकी बनविण्यासाठी निवड झाली आहे. आलापल्ली येथील वनविकास महामंडळाच्या साॅ-मील मध्ये तो सागवान लाकुड गोळा करण्यात येत आहे, तेथे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी काल भेट देऊन पाहणी केली.उपस्थित वन कर्मचारी ह्यांच्याशी संवाद साधला, आपल्या भागातील साहीत्याची निवड होणे ही अत्यंत अभिमानाची तसेच सौभाग्याची बाब आहे असे प्रतिपादन राजेंनी केले.
Tags:
गडचिरोली