लबाड माणसे

/
/////////////////////////
ज्यांनी उत्तम शेती सांगितली त्यांनी कधीही शेती केली नाही
ज्यांनी गाय पवित्र आहे सांगितले त्यांनी कधीही गाय सांभाळली नाही
ज्यांनी सर्वांना सत्यनारायण सांगितला कधीही सत्य नारायण घातला नाही
ज्यांनी अन्नदान महादान सांगितले त्यांनी कधिही अन्नदान केले नाही
ज्यांनी शांती सांगितली त्यांनी कधिही शांती केली नाही
ज्यांनी चारोधाम सांगितले त्यांनी कधीही चारोधाम केले नाही
ज्यांनी महिला शिक्षणाला विरोध केला
त्यांच्या महिला सर्वात जास्त शिकल्या
ज्यांनी परदेशगमनाला विरोध केला
ते सर्वात जास्त एन आर आय आहेत
ज्यांनी सदा कनिष्ठ नौकरी 
म्हटले
ते सर्वात जास्त नौकरीत आहेत
मातृ पितृ देवो भव म्हणणारांचे मातापिता अनाथ आश्रमात आहेत
एकादशी अन्न खावू नका म्हणणारे चिवडा खातात
कधीही मंदिर न बांधणारे
कायम मंदिरात असतात
इतरांना पारायण सांगणारे 
कधीही पारायण ऐकत नाही
परशुरामाला माननारे
रामाचे मंदिराचा वाद घालतात
वारक-यांना दिंडीत पायी पाठवणारे
कारने प्रवास करतात
छत्रपतींना राजा होण्यास
विरोध करणारे 
यवनांचे पाय चाटतात
हिंदु राजा होण्यास विरोध
करणारे हिंदू राष्ट्राची मागणी करतात 
सतीची चाल बंद करणारे इंग्रज
बालविवाह बंद करणारे इंग्रज
सर्वांना शिक्षण देणारे इंग्रज
शुद्रांना सन्मान देणारे इंग्रज
सर्वांचा उध्दार करणारे इंग्रज
त्यां इंग्रजांना हाकलनारे
स्वातंत्र वीर होतात
कायम असत्य बोलनारे
सत्यमेव जयते म्हणतात.

Post a Comment

Previous Post Next Post