होळीच्या दिवशी तिघांचा मृत्यू


दोघांचा रेल्वेने कटून मृत्यू, तर एकाने घेतला गळफास




भद्रावती : होळीच्या दिवशी भद्रावती तालुक्यात एकाने गळफास घेत जीवन संपविले. तर रेल्वे कटून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकुमार किसन पेगडपल्लीवार (४९) घोसरी यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपविली. तर घोडपेठ येथील श्रीकांत किसन मरसकोल्हे (४०) यांचा घोडपेठ रेल्वे लाइनवर तर तिसऱ्या घटनेमध्ये गवराळा परिसरात अनोळखी इसमाचा

रेल्वेने कढून मृत्यू झाला.

होळीनिमित्त सर्वत्र धामधूम सुरू असतानाच भद्रावती तालुक्यात वेगवेगळ्या तीन घटना घडल्या. घोसरी येथील राजकुमार किसन पेगडपल्लीवार (४९) यांनी राहत्या घरी घरी छताला दोर बांधून गळफास घेतला. त्यांच्या आत्महत्येचे कारण

कळू शकले नाही. पोलिसांनी पंचनामा करीत मर्ग दाखल केला आहे. दरम्यान, घोडपेठ येथील श्रीकांत किसन मरसकोल्हे (४०) यांचा घोडपेठ रेल्वे लाइनवर रेल्वेने कटून मृत्यू झाला. हा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. तर तिसऱ्या घटनेमध्ये गणेश मंदिर गवराळा परिसरात अनोळखी इसमाचा रेल्वेने कटून मृत्यू झाला. या इसमाची ओळख पटली नसून, पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला.

Post a Comment

Previous Post Next Post