महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना नाशिक जिल्हा
नाशिक जिल्ह्यात बेमोसमी पावसामुळे द्राक्ष .कांदा. गहू .मका . सोयाबीन. उन्हाळी बाजरी ज्वारी या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे.गेल्या तीन वर्षां पासून अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फक्त कागदावरच पंचनामे केले जातात परंतु कोणत्याही प्रकारची तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना आजुन पर्यंत मिळालेली नाहीत.हातात आलेले पिके बळीराजाच्या डोळ्यासमोर निसर्गाच्या लहरी पणामुळे हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे.कोणत्याही शेती पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे.तरी भाजप व शिंदे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या समाधाना साठी आता खोटे पंचनामे न करता व तुटपुंजी मदत न देता शेतकऱ्यांचे व्याजासह पिककर्ज व विजबीले माफ करावी.अन्याथा आता शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय पर्याय राहाणार नाही.
आपला नंम्र
संपत बाबा वक्ते
जिल्हा अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना
Tags:
नाशिक