रसगुल्ला संपल्यामुळे वर-वधू पक्षांत मारहाण



दिल्ली. आजपर्यंत हुंड्यामुळे लग्नं मोडल्याच्या असंख्य घटना आपण पाहिल्या आहे. कधी लग्नात आईसक्रीम, पनीर किंवा गुलाबजामूनवरून भांडण झाल्याची घटना घडल्या आहेत. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये पाहायला मिळाले आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एका लग्न समारंभात रसगुल्ला संपल्याची अफवा पसरली. रसगुल्ला संपल्यामुळे लग्न मंडपात नातेवाईक संतापले, त्यांच्या

रसगुल्ला संपल्यामुळे कड्याक्याची भांडण झाली. वर आणि वधू दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर जोरदार मारामारी झाली. लोकांनी एकमेकांवर खुर्चा फेकायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ सासनीगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुजपुरा येथील आशु गार्डन मॅरेज होमशी संबंधित आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे

की, 'लग्न मंडपात कार्यक्रम सुरू होता. यावेळी कोणीतरी रसगुल्ला संपल्याची अफवा पसरवली. यावरून कुटुंबीयांमध्ये भांडण झाले. काही वेळातच हाणामारी इतकी वाढली की, दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू झाली. त्यात महिलांचाही सहभाग होता. लोकांनी खुर्च्छा फेकायला सुरुवात केली.' वधूचा भाऊ आणि वहिनी यांच्यात आधीपासून काही कारणावरून वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post