वाघाने केला बैलाला खल्ल्यास

आरमोरी :- तालुकयातील डोंगरगाव भुसारी येथील भोलेनाथ नारदेलवार यांच्या बैलास वाघाने ठार केल्याची घटना बुधवारी घडली. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार भोलेनाथ नारदेलवार यांनी नेहमी प्रमाणे आपली गुर घराशेजारी असलेल्या गोठ्यात बांधली होती. परंतु रात्रीच्या सुमारास वाघाने बैलावर हल्ला करून जागेवरच त्याला ठार केले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरातील कुलर व पंखे चालू असताना नारदेलवार कुटुंबाला गुरांचा आवाज आला नाही. सकाळी उठल्यानंतर ही घटना लक्षात आली. वनविभागालाअसून वनविभागाच्या
अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेमुळे नारदेलवार यांचे अंदाजे पंधरा ते वीस हजारांचे नुकसान झाले आहे. वाघामुळे गुरांसह नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.वाघ गावाशेजारी आल्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने योग्य उपाययोजना करून वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी याबाबत माहिती देण्यात आली केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post