मला लग्नाला बोलावले नाही म्हणून मित्राने पाडले नवरदेवाचे दात...

औरंगाबाद :- लग्न म्हटल्यानंतर नवरदेवाच्या मित्रांसाठी तो एक मोठा उत्सवच असतो मात्र चुकून लग्नाला एका मित्राला बोलावले नाही आणि त्याला विसरला म्हणून संतप्त मित्राने त्याला ‘ त्याच्या लग्नाला का बोलावले नाही ‘ असा जबाब विचारला त्यावर नवरदेवाने तुला कोणी सांगितले असे म्हणताच मित्राने हातातील कडे मारत नवरदेवाचे दातच पाडले. सदर घटना औरंगाबाद येथे वसुंधरा कॉलनी परिसरात 13 एप्रिलला घडलेली असून नवरदेवाच्या या उत्साही मित्राच्या विरोधात छावणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अरविंद रामजी अंभोरे ( वय 32 राहणार छत्रपती शाहू नगर बजाजनगर एमआयडीसी वाळूज ) असे नुकतेच लग्न झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. अरविंद याने लग्नात त्याचा मित्र असलेला कुणाल कैलास सपकाळ याला बोलावले नव्हते म्हणून 13 एप्रिल रोजी वसुंधरा कॉलनीत त्यांची भेट झाल्यावर त्यांच्यात वादावादी झाली आणि कुणाल याने हातातील कडे मारून नवरदेवाला जखमी केले.

कुणाल याने केलेल्या हल्ल्यात अरविंदचे अनेक दात ढिल्ले झालेले असून काही दात पडलेले आहेत तसेच त्याच्या ओठालाही जखम झालेली आहे. कुणाल याने लोखंडी रॉडने नवरदेवाच्या पाठीत व डोक्यात मारहाण केलेली आहे. सदर प्रकरणी नवरदेवाने तक्रार दिलेली असून मित्राच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post