काकाच्या प्रेमात तरुणीने मर्यादा ओलांडल्या , घरातून पलायन केले अन तीनच महिन्यात..

बिहार:- सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रेमप्रकरणाची चर्चा जोरदार सुरू असून बिहार येथील ही घटना आहे. काका आणि पुतणी हे एकमेकांच्या प्रेमात इतके आंधळे झाले की त्या दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले मात्र त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात या मुलीचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झालेला असून त्यामध्ये मृत्युपूर्वी या तरुणीने एक व्हिडिओ शूट केला होता त्यामध्ये तिने तिच्या माहेरच्या व्यक्तींवर गंभीर आरोप केले असल्याने चौकशीला सुरुवात झाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बिहारमधील कोकिलवारा येथील हे प्रकरण असून बावीस वर्षीय पूजा कुमारी आणि तिचा चुलता दीपक दास यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. त्यांचे हे प्रेमसंबंध अर्थातच नात्यात नसल्यामुळे त्यांना जोरदार विरोध झाला आणि त्यांनी गावातून कुणालाही न सांगता पलायन केले. लग्नाच्या तीन महिन्यानंतरच पुजाकुमारी हिची तब्येत अचानक बिघडली आणि शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.

तिचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच तिचे वडील तिच्या घरी पोहोचले तेव्हा सासरची मंडळी ही तिचा अंत्यसंस्कार करण्याचा तयारीत होती मात्र तिच्या वडिलांनी या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिली आणि आपल्या मुलीला जबरदस्तीने या व्यक्तीने पळून नेले आणि त्यानंतर तिची हत्या केली असा आरोप केलेला आहे.

मृत्यूपूर्वी पूजाकुमारी हिने एक व्हिडिओ बनवला होता. तो आता व्हायरल होत असून लग्न करण्यापूर्वी म्हणजे सुमारे तीन महिन्यापूर्वी तिने हा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये ‘ मी माझ्या मर्जीप्रमाणे लग्न करत आहे माझ्या वर कोणीही जबरदस्ती केली नाही. दीपक याच्यावर मी आठ वर्षांपासून प्रेम करते मात्र माझे आई-वडील आणि भाऊ यांच्या विरोधात आहेत , ‘ असे सांगितले होते. सदर प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post