आमचे प्रेम समाजाला मान्य नाही, अशी चिठ्ठी लिहत प्रेमीयुगुलांनी आपले संपवले जीवन

सोलापूर, 13 सप्टेंबर : सोलापूर (Solapur Suicide Case) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आमचे प्रेम समाजाला मान्य नाही, अशी चिठ्ठी लिहत प्रेमीयुगुलांनी आपले जीवन संपवले. ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांनी हे टोकाचे का पाऊल उचलले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.


मागील वर्षीच गणेश विद्यालयात इयत्ता बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेली प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेले वाजीद चांद इनामदार अशी प्रेमीयुगुलांची नावे आहेत. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी 7 वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post