पंचनाम्यासाठी मागितले पैसे; कृषी सहायक निलंबित

नेवासा:- तालुक्यातील जेऊर हैबती, चिलेखनवाडी, देवसडे येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी शेतकर्‍यांकडून एकरी 400 रुपयांची मागणी होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन महिला कृषी सहाय्यक रोहिणी सुभाष मोरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

पंचनामे करण्याकरिता अधिकारी शेतात न जाता गावातील खासगी एजंट शेतकर्‍यांकडे पंचनाम्यासाठी पाठवीत आहेत. हे लोक पैशांची मागणी करतात. त्याशिवाय पंचनामे करत नाहीत. अशी लेखी तक्रार बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली होती. तिची दखल घेत कृषीमंत्र्यांनी कृषी सहाय्यक रोहिणी मोरे यांना निलंबित केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post