चिमूर:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील इरव्हा गावामध्ये वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.
सदर घटना आजची आहे महिलेचे नाव नर्मदा भोयर 45वय असे आहे . सदर महीला आज सकाळी 8.00 वाजता आपल्या शेतात गवत कापायला गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला त्यात ती महिला जागीच ठार झाली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तसेच वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Tags:
चीमुर