अहेरी :- वीर बाबुराव शेडमाके सभागृह ग्रामपंचायत आलापल्ली येथे इंदू ध्यान धर्म प्रचार व त्रेतायुगातील सिध्दांत, भगवतगीता, अनुभनदा ग्रंथ, भगवान रावनब्रह्मा यांच्या सिद्धांताचे पत्रक आणि ग्रंथाचे प्रकाशित पुस्तके वाटप करून चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले त्या प्रसंगात तेलंगाना व आंध्रप्रदेश राज्यातुन सुरू झालेली जनजागृती यात्रा महाराष्ट्रातील सर्व समाजातील व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी असल्याचे मत प्रचारक देवेंद्र रेड्डी, कल्याण, निरंजन सिद्धांती, शिवशिंग यांनी व्यक्त केले, यावेळी ग्रामपंचायत आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते कैलाश कोरेत, वशीलकुमार मोकाशी, कमलापूरचे माजी सरपंच सांभय्या करपेत,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा करून विविध ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.