निराधार व्यक्तीचे अंतिम संस्कार केले टायगर ग्रुप


प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातून थेट पोहचले अंतिम संस्कारात 

अहेरी : टायगर ग्रुप चे सदस्य हे गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेसाठी दिवस-रात्र काम करत असतात आलापल्ली येथे टायगर ग्रुपचे सामाजिक कार्य पाहत प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत आलापल्ली तर्फे भव्य सत्कार करण्यात आले होते त्याच वेळी ग्रुपच्या सदस्यांना फोन द्वारा माहिती मिळाली की श्रीराम चौक आलापल्ली येथील एका आजारी व्यक्तीचे दुःखद निधन झाले आणी त्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार करण्याकरिता त्या परिवाराला दुसरे कोण्ही नातेवाईक नाही अश्या परिस्थितीत ही माहिती टायगर ग्रुपच्या सदस्यांना मिळाली व लगेच टायगर ग्रुपचे सगळे सदस्य तात्काळ कार्यक्रमातून त्या मृत व्यक्तीच्या घरी पोहचले."जे परीवार निराधार त्याला टायगर ग्रुपचे आधार"असे म्हणत ग्रुपचे सदस्य त्या पार्थिवावर विधीवध अंत्यसंस्कार केले.


Post a Comment

Previous Post Next Post