स्वराज्य फाउंडेशन आलापल्लीच्या सामाजिक कार्याचा गौरव



अहेरी : ग्रामीण भागातील शोषित, पीडित, वंचितांच्या समस्यांना घेऊन कार्य करीत असल्याबद्दल स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली सामाजिक संस्थेच्या सदस्यांचा आलापल्ली ग्रामपंचायत तर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 गेल्या  अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात गरजू लोकांना मोफत रुग्णवाहिका सेवा व उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना रक्तपुरवठा ग्रामीण  आणि पुर - परिसथितीत लोकांना तात्काळ मदत अशी अनेक सामाजिक कामे  स्वराज्य फाउंडेशन माध्यमातून केली जात आहेत. ग्रामीण भागातील जनसामान्य जनतेसाठी स्वराज्य फाउंडेशन देवदूत ठरले आहे त्यांचा कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायत आलापल्ली तर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उप वन संरक्षक टोलिया साहेब ,ग्रामविकास अधिकारी मस्के साहेब , आलापल्ली रुग्णालय डॉ. उईके मॅडम, आलापल्ली ग्रा. प.सरपंच शंकर भाऊ मेश्राम व ग्रापंचायत सदस्य सोमेश्वर भाऊ रामटेके,मनोज भाऊ बोलूवार ,पुष्पा ताई अलोणे व सर्व ग्रां. प. सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post