भारतीय महिला व शूद्रांवर बोलणारा बागेश्‍वर धामचा धीरेंद्र शास्त्री ढोंगी समाजवादी पार्टीचे स्वामी प्रसाद मौर्य यांची टीका



कानपूर: भारतीय महिला व शूद्रांवर बोलणारा बागेश्‍वर धामचा धीरेंद्र शास्त्री ढोंगी आहे अशा शब्दात समाजवादी पार्टीचे ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी टीका केली.



स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. यासोबतच त्यांनी धीरेंद्र शास्त्रीला ढोंगी म्हटले आहे. एखाद्याचा अपमान करणे हा धर्माचा भाग नाही. अत्याचार करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि नीच आणि अधर्मी म्हणणे हा धर्म आहे का? असा सवाल करतानाच अशा ढोंगी लोकांकडे जाण्यावर आपला विश्‍वास नसल्याचे त्यांनी सांगितले.



अशा लोकांना धर्माचा पुरस्कार करून देशाला मागे घेऊन जायचे आहे का? आजचे युग हे वैज्ञानिक असून आज लोक चंद्रावर जात आहेत. ग्रहांचा शोध घेतल्यानंतर ते तिथे जाण्याच्या तयारीत आहेत. आपण सर्व धर्मांचा आदर करतो. रामचरितमानसच्या मते, शूद्र कितीही शिकलेला असला तरी त्याचा आदर करू नये. शेवटी यात न्याय कुठे आहे? असा सवाल मौर्य यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post