स्वराज्य फाउंडेशन वेलगूर ने दिले हरणाला जीवदान




अहेरी :- स्वराज्य फाउंडेशन वेलगुर येथील पदाधिकार्यांनी दिले हरणाला जीवदान
वेलगुर येथील जंगलात एका हरणाच्या च्या मागे काही कुत्रे लागले होते त्यांच्यापासून बचाव करण्याकरिता हरणाने गावाकडे पळ काढला तरी त्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करून गावजवळच कुत्रे त्या हरणाला ला चावा घेत होते त्यात ते हरीण गंभीर जखमी झाले ही बाब स्वराज्य फाउंडेशन वेलगुर चे पदाधिकारी प्रीतम राऊत ,अक्षय सात्रे, रोहित गौतरे, शंतनु मुजुमदार ,महेश राऊत, रुपेश शेंडे, रोहित गलबले ,दीपक चुनारकर यांना कळाली ते लगेच त्या घटना स्थळी पोहचले तेव्हा ही कुत्रे त्या चित्तराच्या अंगावर पडून चावा घेत होते त्यांनी लगेच जाऊन त्या कुत्रांना दूर हाकलून हरणाचे प्राण वाचवले व तसेच आलापल्ली येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करून त्या हरणाला त्यांच्या स्वाधीन केले.

Post a Comment

Previous Post Next Post