सर्वोच न्यायालयाने घटस्फोटासंदर्भात ऐतिहासिक निर्णय दिला आहे. पूर्वी घटस्फोट घेण्यासाठी सहा महिने थांबावं लागत होत मात्र आता जर नातेसंबंधा मध्ये सुधारणा होत नसेल, तर थांब्याची गरज नाही असं न्यायालयाने म्हटले आहे.
🧐 *सलमान खानाला मुंबई वाटू लागली असुरक्षित*
सलमान खानला गेल्या काही दिवसापासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. मुंबईतील त्यांच्या घराभोवती मुंबई पोलिसांनी कडकोड बंदोबस्त लावला आहे, सलमान खानाने देखील आता या सगळ्या परिस्थीवर भाष्य केले आहे. आता मला मुंबई पेक्षा दुबई जास्त सुरक्षित वाटू लागली आहे दुबई सुरक्षेच्या दृष्टीने मला जास्त जवळची वाटत असून मुंबईमध्ये काहीही सुरक्षित नसल्याचे दिसून येते असे सलमान खानाने म्हटले आहे.
🎗️ *राज्यातील पहिल्या वाळू डेपोचा शुभारंभ*
अवैध वाळू उपशाला लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने नवीन वाळू धोरण अमलात आणलंय. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या वाळू डेपोचा शुभारंभ झालाय. त्यामध्ये 600 रुपये ब्रासने सर्वसामान्य नागरिकांना वाळू मिळणार आहे. तसेच बांधकाम व्यवसायिक घर बांधणा-यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
Tags:
मुंबई