तो पुन्हा आला.... वाघाने मागेहून झडप घालून केले शेतकऱ्याला ठार

ब्रम्हपुरी:- ब्रह्मपुरी उत्तर वनपरिक्षेत्रामध्ये येणारे गाव अड्याळ हे ब्रह्मपुरी वरून ८ किलोमीटर अंतरावर आहे.

येथील शेत शिवारात मेंढा या गावचे रहिवासी विलास विठोबा रंधये यांची शेती ही अड्याळ या गावी असल्याने ते आपल्या शेतीमध्ये निंदा सुरू असताना गेले होते तरी, ते निंदा बरोबर होत आहे की नाही या देखरेखीकरिता जंगलालगतच्या उंच बांधीवरून उभे होऊन देखरेख करत असताना वाघाने मागून झडप घेऊन त्यांना जागीच ठार केले.

विलास विठोबा रंधये यांचे वय 48 वर्षे होते. सदर घटना बारा वाजताच्या सुमारास घडली आहे. वाघाने हल्ला केल्याची घटना आहे सतत ही दुसऱ्या दिवशीही झाली असून गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.












Post a Comment

Previous Post Next Post