प्रेमासाठी काय पण...! तरुण सरपंचाने घेतले विष
अहमदनगर: विवाहित प्रेयसीसोबत राहू दिले जात नाही. दोघांना त्रास दिला जातो. आम्ही दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत, असे निवेदन लिहून जिल्हाधिकारी कार्यालयातच विष प्राशन करून श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील सरपंच अविनाश मिस्टर चव्हाण (२६) याने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी घडली.
अविनाश अडीच वर्षांपूर्वी घोटवी गावाचा सरपंच झाला. त्याचदरम्यान त्याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले. ही बाब गावातील काही लोकांना व तिच्या नवऱ्याला समजली. त्यामुळे मारहाण करीत नवऱ्याने माहेरी पाठविले. त्यानंतर दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला; परंतु त्यांना नाशिकवरून परता आणण्यात आले. त्यानंतर दोघेहि आम्हाला एकत्र राहायचे आहे, असे नातेवाइकांना सांगत होते. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सरपंच अविनाश कचेरीत आला होता.
Tags:
अहमदनगर